By : Sangharshkranti Team ,2026-02-14
संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा
दि.14 फेब्रुवारी 2026
(उज्वला उल्हारे)
श्रीगोंदा तालुक्यातील नागवडे सहकारी साखर कारखाना च्या २०२५-२६ या गळीत हंगामाचा समारोप मंगळवारी (दि. १०) उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कारखान्याच्या गव्हाणीची विधिवत पूजा करून श्रीफळ व अखेरची उसाची मोळी गव्हाणीत टाकत यंदाच्या हंगामाची औपचारिक सांगता करण्यात आली.
कारखान्याचे संचालक लक्ष्मण रायकर, मारुती पाचपुते व ज्ञानदेव खरात यांच्या हस्ते हा समारंभ पार पडला. यावेळी अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी हंगामाचा आढावा घेत कारखान्याने आव्हानात्मक परिस्थितीतही उल्लेखनीय कामगिरी केल्याचे सांगितले.
अध्यक्ष नागवडे म्हणाले की, विविध तांत्रिक व आर्थिक अडचणींवर मात करत यंदा कारखान्याने तब्बल ५ लाख ८० हजार मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण केले. तसेच ६ लाख ६ हजार साखर पोती उत्पादित करण्यात आली असून, सरासरी १०.५० टक्के साखर उतारा मिळाला आहे. हा उतारा समाधानकारक असून, शेतकरी व कारखान्याच्या दृष्टीने सकारात्मक असल्याचे त्यांनी नमूद केले.
कारखान्याच्या मशिनरीमध्ये करण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण बदलांमुळे दैनंदिन गाळप क्षमता वाढून साडेसहा ते सात हजार मेट्रिक टनांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे भविष्यात कमी कालावधीत अधिक गाळप करणे शक्य होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
हंगाम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सभासद व ऊस उत्पादक शेतकरी, ऊसतोड मुकादम, मजूर, वाहतूकदार, ठेकेदार आणि कारखान्याचे कामगार यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे अध्यक्षांनी नमूद केले. सर्व घटकांच्या एकत्रित प्रयत्नामुळेच हा हंगाम सुरळीत आणि यशस्वीरीत्या पूर्ण झाला, असे त्यांनी सांगितले.
या प्रसंगी संदीप औटी, संचालक भाऊसाहेब नेटके, शरदराव जगताप, विश्वनाथ गिरमकर, विठ्ठल जंगले, सावता हिरवे, बंडू जगताप, प्रा. सुरेश रसाळ, प्रवीण लबडे, दत्तात्रय कातोरे यांच्यासह कामगार युनियनचे अध्यक्ष रामभाऊ लबडे, मधुकर हिरवे, दीपक तारकुंडे, मुकादम धुलचंद राठोड, नामदेव राठोड, कार्यकारी संचालक प्रवीण शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक सुभाष शिंदे यांनी केले, तर श्रीनिवास घाडगे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
यंदाचा हंगाम समाधानकारक ठरत कारखान्याच्या प्रगतीच्या दिशेने महत्त्वाचा टप्पा ठरला असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली आहे.
पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाआभियानातून कार्यकर्ते घडतात - सभापती प्रा.राम शिंदे
श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गडावर अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन!
१५ दिवसांपासून भरकटलेल्या मनोरुग्ण वृद्ध महिलेला अखेर कुटुंबाचा आधार!
आकाश सूर्यवंशी यांचा ‘बेस्ट इंजिनिअरिंग अवॉर्ड’ने सन्मान ...
किल्ले रायगड येथे शिवशाहीर विक्रम अवचिते यांचा पोवाड्याचा कार्यक्रम संपन्न!
जिल्हा परिषदेच्या मांढरेवस्ती शाळेने मिळवले गुणदर्शन स्पर्धेत यश!
म्हस्केवाडी येथे रविवारी संकष्ट चतुर्थी निमित्त उत्साहाचे आयोजन !
गुणवडी उत्कर्ष न्यासतर्फे आमदार अॅड.विक्रमसिंह पाचपुते यांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न!
शनि चौक, श्रीगोंदा येथे शहीद दिन साजरा!
महात्मा फुले उद्यान प्रकरणाने संतापाची लाट ,शहर बंद,पोलिस ठाण्यावर नागरिकांचा मोर्चा!
कौशल्याधारित शिक्षणातून महाराष्ट्राची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल- CM फडणवीस
नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा ,गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण!
उत्कृष्ट लेखापरीक्षक संतोष तरटे यांचा पुन्हा राज्यस्तरीय गौरव, सलग दुसऱ्यांदा यशाची नोंद!
कोल्हार भगवतीपूर येथे सर्व मंदिरांचे ध्वज बदलले,नववर्ष ध्वज मिरवणूक व चैत्र शोभा यात्रा संपन्न!
श्रीक्षेत्र कोंभळी येथे भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन..
स्वामींच्या दर्शनाला रांधे नगरीत भाविकांची मोठी गर्दी- ह.भ.प अशोक महाराज शिंदे .
विषमुक्त शेती करणे काळाची गरज - ह.भ.प राजेंद्रजी गोरे
श्रीगोंद्यात १००% शास्तीकर माफीचा ऐतिहासिक निर्णय,नागरिकांना मोठा दिलासा!
श्री क्षेत्र कोंभळी ते श्री क्षेत्र मढी पायी दिंडीचे भक्तिमय प्रस्थान,नाथांच्या नामगजरात परिसर दुमदुमला..
आमदार मोनिका ताई राजळे यांच्या आदेशानंतर शेवगाव आगाराची तातडीने कारवाई!