By : Sangharshkranti Team ,2026-02-14
संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा
दि.14 फेब्रुवारी 2026
(उज्वला उल्हारे)
राज्यातील शासकीय कार्यालयांचे कामकाज अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि कार्यक्षम करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यानुसार राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नागरिकांसाठी अभिप्राय यंत्रणा राबविणे बंधनकारक करण्यात आले आहे. या निर्णयामुळे नागरिकांना थेट त्यांच्या अनुभवावर आधारित अभिप्राय देण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
काय आहे हा निर्णय?
राज्य शासनाच्या निर्देशानुसार आता प्रत्येक शासकीय, निमशासकीय कार्यालय तसेच महापालिका, नगरपालिका, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये कुलूपबंद अभिप्राय पेटी ठेवणे आवश्यक असणार आहे. ही अभिप्राय पेटी सर्वसामान्य नागरिकांना सहज दिसेल व उपलब्ध होईल अशा ठिकाणी ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
अभिप्राय फॉर्म अनिवार्य अभिप्राय पेटीजवळच शासनाने निर्धारित केलेल्या नमुन्यातील अभिप्राय फॉर्म उपलब्ध करून देणे संबंधित कार्यालयांना बंधनकारक असेल. या फॉर्मद्वारे नागरिकांना कार्यालयीन सेवा व कामकाजाबाबत आपले मत नोंदवता येणार आहे.
१ ते ५ गुणांमध्ये मूल्यांकन नागरिकांना कार्यालयातील स्वच्छता,सेवा देण्याची पद्धत व गती,अधिकारी व कर्मचाऱ्यांची वर्तवणूक,कामकाजातील सुलभता किंवा विलंब या बाबींवर १ ते ५ गुणांमध्ये मूल्यांकन करता येणार आहे. यासोबतच नागरिकांना मुक्त स्वरूपात लेखी अभिप्राय देण्याची मुभादेखील देण्यात आली आहे.
दर आठवड्याला अभिप्राय वाचन या निर्णयानुसार संबंधित कार्यालय प्रमुखांना दर आठवड्याला अभिप्राय पेटी उघडून प्राप्त अभिप्रायाचे वाचन व मूल्यांकन करणे बंधनकारक असणार आहे. प्राप्त सूचनांनुसार आवश्यक सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच गंभीर तक्रारींची नोंद घेऊन त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देशही शासनाने दिले आहेत.
प्रशासन अधिक जबाबदार होणार या निर्णयामुळे शासकीय कार्यालयांमधील कामकाजात पारदर्शकता वाढणार असून अधिकारी व कर्मचारी अधिक जबाबदारपणे काम करतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. नागरिकांच्या थेट सहभागामुळे प्रशासन आणि जनतेतील दरी कमी होण्यास मदत होणार आहे.
राज्य शासनाच्या या निर्णयाचे सर्वसामान्य नागरिकांकडून स्वागत होत असून, प्रत्यक्ष अंमलबजावणी प्रभावीपणे झाल्यास शासकीय कार्यालयांच्या कामकाजात निश्चितच सकारात्मक बदल घडून येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
छत्रपती शिवाजी महाराज नसते तर भारताचा इतिहास, भूगोल काहीही शिल्लक राहिले नसते - CM फडणवीस
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे उर्जा, विश्वास आणि शौर्याचे प्रतीक!
श्री क्षेत्र मढी येथे पर्यावरण पूरक भट्टी होळी पेटून यात्रा उत्सवाचा शुभारंभ!
श्रीगोंदा येथे जोधपुर मारुती चौकात नेत्र दीपक शिवजयंती उत्सवाचे आयोजन!
आई-वडिलांच्या पायी चारीधामाचे पुण्य- ह.भ.प.राजेंद्रजी गोरे महाराज
सदगुरु कृषी महाविद्यालयात क्रांतिवीर लहुजी वस्ताद व क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांना विनम्र अभिवादन!
मुंबई क्लायमेट वीक 2026 : हरित भविष्यासाठी जागतिक संकल्प!
बहुध्रुवीय जगात विश्वासाचा केंद्रबिंदू भारत आणि महाराष्ट्र - CM फडणवीस
शाळेने दिलेल्या संस्काराची परतफेड करण्याची हीच योग्य वेळ - मा.अध्यक्ष बाबासाहेब भोस
पशुधन संवर्धनातून कृषीक्षेत्राला नवसंजीवनी - मुख्यमंत्री फडणवीस
ऑन्कोलॉजी बियॉन्ड बॉर्डर्स कर्करोगाविरुद्ध लढ्याला नवी दिशा - CM फडणवीस
राजरत्न पुरस्कार सोहळा 2026 : परंपरा, प्रतिष्ठा आणि कर्तृत्वाचा गौरव!
नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या २०२५-२६ गाळप हंगामाची यशस्वी सांगता!
गुणवडी तलावातून १६ फेब्रुवारीपासून आवर्तन सोडण्याचे निर्देश!
शासकीय कार्यालयांत आता नागरिकांना अभिप्राय देता येणार ...
लिंपणगावच्या सिद्धेश्वर महाराजांचा महाशिवरात्री निमित्त यात्रा उत्सव!
महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी प्रो. डॉ. प्रकाश साळवे
आपला एक दगड नाथ मंदिरासाठी…
शिक्षणाने माणुस घडतो पण माणुसकी कमवावी लागते - साहित्यिक अनंत कराड
पारधी विकास आराखड्याची पारदर्शक अंमलबजावणी करा- आदिवासी शक्ती संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन..