By : Sangharshkranti Team ,2026-02-20
संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा
दि.20 फेब्रुवारी 2026
(उज्वला उल्हारे)
देशातील एकमेव अध्यात्मिक गाव म्हणून ओळख असलेल्या श्री क्षेत्र मढी येथे हुताशनी पौर्णिमेच्या अगोदर तब्बल १५ दिवस साजरा होणारा भट्टी (होळी) उत्सव बुधवारी पारंपरिक, धार्मिक आणि पर्यावरणपूरक पद्धतीने मोठ्या उत्साहात पार पडला. सुमारे ५०० वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या या होळी सोहळ्याला ग्रामस्थांसह भाविकांची मोठी उपस्थिती लाभली.
नाथांची शेजारती झाल्यानंतर संपूर्ण गाव एकत्र येत कानिफनाथ मंदिरासमोर एकच सार्वजनिक होळी विधिवत पूजा करून रात्री नऊ वाजता पेटविण्यात आली. भट्टीची पूजा मढी देवस्थानचे पदाधिकारी व पुजाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी उपजिल्हाधिकारी गणेश मरकड, प्रांताधिकारी प्रसाद मते, तहसीलदार उद्धव नाईक, पोलीस निरीक्षक विलास पुजारी, देवस्थानचे अध्यक्ष विठ्ठल मरकड, कोषाध्यक्ष दादासाहेब मरकड, सचिव माधुरी मरकड, विश्वस्त उत्तम मरकड, अनिल साठे, उषा मरकड, भाजपा युवा मोर्चाचे कुशल भापसे, माजी सरपंच भगवान मरकड, बाळासाहेब मरकड, बबन महाराज भिशे, प्रदीप पाखरे, शंकर पाखरे, विष्णू महाराज मरकड, राधाकिसन मरकड, भागेश मरकड, किरण मरकड, चंद्रभान पाखरे, बाळासाहेब मरकड, शामराव मरकड, डॉ. रमाकांत मरकड, ग्रामविकास अधिकारी गणेश ढाकणे, संतोष मरकड, किरण मरकड, कार्यकारी आधिकारी अशोक पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
गावातून सुमारे दोन टन गोवऱ्या वाजत-गाजत गडावर आणण्यात आल्या. सूर्यास्तापूर्वी भट्टी रचून रात्री तिचे प्रज्वलन करण्यात आले. सुमारे १५ फूट व्यासाचे वर्तुळ आणि दहा फूट उंचीची भव्य रचना करण्यात आली होती.
या होळीचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण भट्टी गायीच्या शेणापासून तयार केलेल्या गोवऱ्यांनीच उभारण्यात आली असून लाकडाचा अजिबात वापर करण्यात आलेला नाही. पर्यावरणपूरक परंपरेचे जतन करत नाथ संप्रदायाची ही भव्य धूनी म्हणून भाविक या होळीचे दर्शन घेतात.
मढीत घरोघरी पाहुण्यांची वर्दळ होती तर गडावर भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. गावातील प्रत्येक घरातून नाथांना व होळीसाठी पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. भट्टी पेटल्यानंतर भाविकांनी प्रदक्षिणा घालत नारळ अर्पण केले. हुताशनी पौर्णिमेला सार्वजनिक होळीचा मान गोपाळ समाजाला असून त्या दिवशी ग्रामस्थ स्वतंत्रपणे होळी साजरी करत नाहीत, ही येथील वैशिष्ट्यपूर्ण परंपरा आहे.श्री क्षेत्र मढी येथे चैतन्य कानीफनाथांची संजीवन समाधी असून होळीपासून सुरू झालेली यात्रा गुढीपाडव्यापर्यंत चालते. धार्मिक श्रद्धा, सामाजिक एकजूट आणि पर्यावरणपूरक संदेश यांचा संगम असलेली मढीची भट्टी होळी राज्यभरातील भक्तांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
श्री क्षेत्र चोंडीच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटीबद्ध - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त श्रीक्षेत्र चोंडी येथे विविध नेत्रदीपक कार्यक्रमांचे आयोजन!
रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलवर बाबासाहेब भोस यांची बिनविरोध निवड!
श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीत ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन’ उभारणीस मंजुरी!
दोन लेकी आणि एका चिमुकल्या मुलासाठी जगण्याची झुंज देणाऱ्या बापाची हृदयद्रावक कहाणी..
ओंकार उद्योग समूहाची राज्यभर घोडदौड गतीमान,अफवा पसरवणांऱ्यावर कठोर कारवाईचा ओमराजे बोत्रे पाटील यांचा इशारा!
पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाआभियानातून कार्यकर्ते घडतात - सभापती प्रा.राम शिंदे
श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गडावर अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन!
१५ दिवसांपासून भरकटलेल्या मनोरुग्ण वृद्ध महिलेला अखेर कुटुंबाचा आधार!
आकाश सूर्यवंशी यांचा ‘बेस्ट इंजिनिअरिंग अवॉर्ड’ने सन्मान ...
किल्ले रायगड येथे शिवशाहीर विक्रम अवचिते यांचा पोवाड्याचा कार्यक्रम संपन्न!
जिल्हा परिषदेच्या मांढरेवस्ती शाळेने मिळवले गुणदर्शन स्पर्धेत यश!
म्हस्केवाडी येथे रविवारी संकष्ट चतुर्थी निमित्त उत्साहाचे आयोजन !
गुणवडी उत्कर्ष न्यासतर्फे आमदार अॅड.विक्रमसिंह पाचपुते यांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न!
शनि चौक, श्रीगोंदा येथे शहीद दिन साजरा!
महात्मा फुले उद्यान प्रकरणाने संतापाची लाट ,शहर बंद,पोलिस ठाण्यावर नागरिकांचा मोर्चा!
कौशल्याधारित शिक्षणातून महाराष्ट्राची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल- CM फडणवीस
नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा ,गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण!
उत्कृष्ट लेखापरीक्षक संतोष तरटे यांचा पुन्हा राज्यस्तरीय गौरव, सलग दुसऱ्यांदा यशाची नोंद!
कोल्हार भगवतीपूर येथे सर्व मंदिरांचे ध्वज बदलले,नववर्ष ध्वज मिरवणूक व चैत्र शोभा यात्रा संपन्न!