By : Sangharshkranti Team ,2026-02-20
संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा
दि.20 फेब्रुवारी 2026
(उज्वला उल्हारे)
अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध ठिकाणी अभिवादन, पूजन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले. ऐतिहासिक स्मृतींना उजाळा देत स्थानिक नागरिक, सामाजिक संघटना, लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी मोठ्या संख्येने सार्वजनिक ठिकाणी एकत्र आले होते.
शहरातील प्रमुख जोधपूर मारुती चौक येथे शिवकन्या आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करण्यात आले. प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी माजी मंत्री बबनराव पाचपुते, परिक्रमा शैक्षणिक संकुलाच्या अध्यक्षा डॉ. प्रतिभाताई पाचपुते, नगराध्यक्षा सुनीताताई खेतमाळीस, उपनगराध्यक्षा अलकाताई अनुभुले, माजी आमदार राहुल जगताप, युवानेते दिग्विजय नागवडे, माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे, शुभांगी पोटे, नगरसेविका मिरा शिंदे, प्रशांत गोरे, सीमाताई गोरे, अमीन शेख, बापूशेठ माने,भाजपा उपाध्यक्ष राजेंद्र उकांडे , संजय खेतमाळीस, पत्रकार गायत्री ढवळे ,संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अरविंद कापसे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी तहसीलदार सचिन डोंगरे, गटविकास अधिकारी तसेच पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनीही सक्रिय सहभाग घेतला. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि आध्यात्मिक क्षेत्रातील प्रतिनिधींनी उपस्थित राहून शिवरायांना अभिवादन केले.
शिवजन्मोत्सव समितीच्या अध्यक्षा मीराताई खेंडके आणि उपाध्यक्षा चेतना मांगडे यांच्या नेतृत्वाखाली नेत्रदीपक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. समितीचे सदस्य नाना शिंदे, दीपक मखरे, गणेश पारे, श्याम जरे, दिलीप लबडे, राजेंद्र राऊत आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील ढवळे आणि बालू मखरे यांनी केले.
शिवजयंतीनिमित्त शहरात विविध सांस्कृतिक आणि क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. वेशभूषा स्पर्धा, गायन स्पर्धा, रांगोळी स्पर्धा तसेच मॅरेथॉनमध्ये विद्यार्थी आणि युवकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित सादरीकरणे करून उपस्थितांची मने जिंकली.
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी स्थानिक पोलीस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. प्रशासनाच्या माहितीनुसार, सर्व कार्यक्रम शांततेत आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडले.
दरवर्षी १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रात शिवजयंती साजरी केली जाते. श्रीगोंद्यातील या उत्सवातून ऐतिहासिक वारशाबद्दलचा आदर, सामाजिक एकजूट आणि युवकांमधील प्रेरणादायी भावना स्पष्टपणे दिसून आली.
छत्रपती शिवाजी महाराज नसते तर भारताचा इतिहास, भूगोल काहीही शिल्लक राहिले नसते - CM फडणवीस
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे उर्जा, विश्वास आणि शौर्याचे प्रतीक!
श्री क्षेत्र मढी येथे पर्यावरण पूरक भट्टी होळी पेटून यात्रा उत्सवाचा शुभारंभ!
श्रीगोंदा येथे जोधपुर मारुती चौकात नेत्र दीपक शिवजयंती उत्सवाचे आयोजन!
आई-वडिलांच्या पायी चारीधामाचे पुण्य- ह.भ.प.राजेंद्रजी गोरे महाराज
सदगुरु कृषी महाविद्यालयात क्रांतिवीर लहुजी वस्ताद व क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांना विनम्र अभिवादन!
मुंबई क्लायमेट वीक 2026 : हरित भविष्यासाठी जागतिक संकल्प!
बहुध्रुवीय जगात विश्वासाचा केंद्रबिंदू भारत आणि महाराष्ट्र - CM फडणवीस
शाळेने दिलेल्या संस्काराची परतफेड करण्याची हीच योग्य वेळ - मा.अध्यक्ष बाबासाहेब भोस
पशुधन संवर्धनातून कृषीक्षेत्राला नवसंजीवनी - मुख्यमंत्री फडणवीस
ऑन्कोलॉजी बियॉन्ड बॉर्डर्स कर्करोगाविरुद्ध लढ्याला नवी दिशा - CM फडणवीस
राजरत्न पुरस्कार सोहळा 2026 : परंपरा, प्रतिष्ठा आणि कर्तृत्वाचा गौरव!
नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या २०२५-२६ गाळप हंगामाची यशस्वी सांगता!
गुणवडी तलावातून १६ फेब्रुवारीपासून आवर्तन सोडण्याचे निर्देश!
शासकीय कार्यालयांत आता नागरिकांना अभिप्राय देता येणार ...
लिंपणगावच्या सिद्धेश्वर महाराजांचा महाशिवरात्री निमित्त यात्रा उत्सव!
महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी प्रो. डॉ. प्रकाश साळवे
आपला एक दगड नाथ मंदिरासाठी…
शिक्षणाने माणुस घडतो पण माणुसकी कमवावी लागते - साहित्यिक अनंत कराड
पारधी विकास आराखड्याची पारदर्शक अंमलबजावणी करा- आदिवासी शक्ती संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन..