By : Sangharshkranti Team ,2026-02-18
संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा
दि.18 फेब्रुवारी 2026
(उज्वला उल्हारे)
राष्ट्रीय सेवा योजनेच्या अरणगाव येथील आयोजित विशेष श्रमसंस्कार शिबिरामध्ये ह.भ.प. राजेंद्रजी गोरे महाराज यांचे चला घडवूया नवी पिढी या विषयावर युवा पिढीसाठी प्रेरणा देणारे व्याख्यान संपन्न.
सद्गुरु कृषी महाविद्यालय, मिरजगाव मधील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) च्या वतीने आयोजित अरणगाव येथील विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या तिसऱ्या दिवशी (दि. १३ फेब्रुवारी २०२६) ह.भ.प. राजेंद्रजी गोरे महाराज (अध्यक्ष साईबाबा प्रतिष्ठान, मिरजगाव व सचिव श्री सं.ग. म. ग्रा. वि. प्र., मिरजगाव) यांचे चला घडवूया नवीन पिढी या विषयावर युवा पिढीला मार्गदर्शन करणारे व्याख्यान संपन्न झाले.या व्याख्याना मध्ये त्यांनी युवकांना अनेक उदाहरणे देऊन वागण्याचे व व्यक्तिमत्व विकासाची विकासाचे सल्ले दिले. पुढे जाऊन आई-वडील हे आपल्यासाठी श्रेष्ठ दैवत आहेत, त्यांचा सन्मान करावा त्यातूनच आपली प्रगती होणार आहे असे सांगितले. आई-वडिलांच्या पायी चार धामाचे पुण्य एकवटले आहे असे सांगितले. आपल्या सर्वांच्या जीवनातील आई- वडिलांचे महत्त्व विदित करताना महाराजांनी आपल्या जीवनातील अनेक रोमांचकारी प्रसंग आणि आठवणी सर्व श्रोत्यांसमोर मांडल्या. शेवटी जाता जाता त्यांनी आपली सर्वांची नाळ पर्यावरणाशी कशी जोडलेली आहे हे तुकारामांच्या वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या अभंगातून पटवून दिले.
प्रमुख उपस्थिती मधील नन्नावरे महाराज यांनी आजच्या व्याख्यानातील विषय खूप महत्त्वाचा व आजच्या परिस्थितीवर भाष्य करणारा आहे असे म्हटले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सद्गुरु कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामदास बिटे यांनी भूषवले. तसेच उपस्थित ग्रामस्थांना कृषीविषयक मार्गदर्शन केले व राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना शिस्तप्रिय राहून गावामध्ये विविध विषयासमधी जनजागृती करावी व गावाच्या विकासासाठी आपले योगदान म्हणून श्रमदान करावे असे सांगितले. कार्यक्रमास अरणगावातील आजी, माजी, सरपंच, प्रतिष्ठित नागरिक आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, प्रा. डॉ. प्रियांका दहिवले, प्रा. डॉ. प्रियांका जाधव, कार्यक्रम अधिकारी प्रा. बाळासाहेब पारखे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यक्रम समन्वयक प्रा. डॉ. सागर कारंडे यांनी केले तसेच आभार प्रदर्शन हे कार्यक्रम अधिकारी प्रा. श्री. तेजस गायकवाड यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराज नसते तर भारताचा इतिहास, भूगोल काहीही शिल्लक राहिले नसते - CM फडणवीस
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे उर्जा, विश्वास आणि शौर्याचे प्रतीक!
श्री क्षेत्र मढी येथे पर्यावरण पूरक भट्टी होळी पेटून यात्रा उत्सवाचा शुभारंभ!
श्रीगोंदा येथे जोधपुर मारुती चौकात नेत्र दीपक शिवजयंती उत्सवाचे आयोजन!
आई-वडिलांच्या पायी चारीधामाचे पुण्य- ह.भ.प.राजेंद्रजी गोरे महाराज
सदगुरु कृषी महाविद्यालयात क्रांतिवीर लहुजी वस्ताद व क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांना विनम्र अभिवादन!
मुंबई क्लायमेट वीक 2026 : हरित भविष्यासाठी जागतिक संकल्प!
बहुध्रुवीय जगात विश्वासाचा केंद्रबिंदू भारत आणि महाराष्ट्र - CM फडणवीस
शाळेने दिलेल्या संस्काराची परतफेड करण्याची हीच योग्य वेळ - मा.अध्यक्ष बाबासाहेब भोस
पशुधन संवर्धनातून कृषीक्षेत्राला नवसंजीवनी - मुख्यमंत्री फडणवीस
ऑन्कोलॉजी बियॉन्ड बॉर्डर्स कर्करोगाविरुद्ध लढ्याला नवी दिशा - CM फडणवीस
राजरत्न पुरस्कार सोहळा 2026 : परंपरा, प्रतिष्ठा आणि कर्तृत्वाचा गौरव!
नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या २०२५-२६ गाळप हंगामाची यशस्वी सांगता!
गुणवडी तलावातून १६ फेब्रुवारीपासून आवर्तन सोडण्याचे निर्देश!
शासकीय कार्यालयांत आता नागरिकांना अभिप्राय देता येणार ...
लिंपणगावच्या सिद्धेश्वर महाराजांचा महाशिवरात्री निमित्त यात्रा उत्सव!
महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी प्रो. डॉ. प्रकाश साळवे
आपला एक दगड नाथ मंदिरासाठी…
शिक्षणाने माणुस घडतो पण माणुसकी कमवावी लागते - साहित्यिक अनंत कराड
पारधी विकास आराखड्याची पारदर्शक अंमलबजावणी करा- आदिवासी शक्ती संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन..