बहुध्रुवीय जगात विश्वासाचा केंद्रबिंदू भारत आणि महाराष्ट्र - CM फडणवीस

By : Sangharshkranti Team ,2026-02-18

बहुध्रुवीय जगात विश्वासाचा केंद्रबिंदू भारत आणि महाराष्ट्र - CM फडणवीस

संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा 

दि.18 फेब्रुवारी 2026

(उज्वला उल्हारे)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी  मुंबई येथे ग्लोबल इकॉनॉमिक को-ऑपरेशन 2026 च्या उदघाटन कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती दर्शवली.

जागतिक आर्थिक व्यवस्थेची नव्याने पुनर्रचना सुरू असताना आयोजित या परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी भारताची वाढ ही योगायोग नसून संरचनात्मक परिवर्तनाचे फलित असल्याचे स्पष्ट केले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, जागतिक व्यापार, पुरवठा साखळी, ऊर्जा, सेमीकंडक्टर, कृत्रिम बुद्धिमत्ता तसेच बदलत्या भूराजकीय संरचनेच्या नव्या समीकरणांमध्ये भारत आज एक निर्णायक आणि प्रभावी इंजिन म्हणून उदयास येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने मोठ्या बाजारपेठेपासून विश्वासार्ह रणनीतिक भागीदारापर्यंतचा प्रवास पूर्ण केला आहे. G20 अध्यक्षपद, डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर, IMEC आर्थिक कॉरिडॉर आणि ग्लोबल साऊथचा आवाज म्हणून भारताने नव्या जागतिक व्यवस्थेत सक्रिय भूमिका बजावली आहे. 

महाराष्ट्राच्या भूमिकेबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्र भारताच्या GDP मध्ये सुमारे 14-15% योगदान देते, औद्योगिक उत्पादनात जवळपास 20% वाटा उचलते आणि पश्चिम किनारपट्टीवरील बंदरांमार्फत 60% पेक्षा अधिक कंटेनर वहन हाताळते. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून RBI, BSE, NSE, NPCI यांसारख्या प्रमुख संस्थांचे केंद्र आहे. भारत ही विकासाची प्रेरणादायी कहाणी असेल, तर महाराष्ट्र हा त्या विकासाचा आधारस्तंभ आहे.असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठामपणे सांगितले.

IMEC, इंडो-पॅसिफिक समुद्री फ्रेमवर्क, वाढवण बंदर, जेएनपीटी, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, औद्योगिक कॉरिडॉर आणि समर्पित मालवाहतूक मार्ग यांमुळे महाराष्ट्र जागतिक आर्थिक कॉरिडॉरचा पश्चिमेकडील अँकर बनण्यास सज्ज आहे. राज्यात EV, ॲडव्हान्स केमिस्ट्री सेल, इलेक्ट्रॉनिक्स, फार्मा, संरक्षण उत्पादन, हरित हायड्रोजन आणि नवीकरणीय ऊर्जेमध्ये मोठ्या गुंतवणुकीला चालना मिळत आहे.

शाश्वत पायाभूत सुविधा, ग्रीन बाँड्स, म्युनिसिपल बाँड्स आणि सार्वभौम निधी भागीदारीद्वारे दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र सज्ज आहे. आर्थिक सार्वभौमत्व म्हणजे आत्मनिर्भरतेसह सहकार्य, तसेच आम्ही टिकाऊ भागीदारी शोधत आहोत, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.

यावेळी फ्यूचर इकॉनॉमिक को-ऑपरेशन कौन्सिल चे कार्यकारी संचालक डॉ. विजय चौथाईवाले, भारत फोर्ज लि.चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक बाबा कल्याणी यांच्या समवेत इतर मान्यवर उपस्थित होते.

पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाआभियानातून कार्यकर्ते घडतात - सभापती प्रा.राम शिंदे

श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गडावर अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन!

१५ दिवसांपासून भरकटलेल्या मनोरुग्ण वृद्ध महिलेला अखेर कुटुंबाचा आधार!

आकाश सूर्यवंशी यांचा ‘बेस्ट इंजिनिअरिंग अवॉर्ड’ने सन्मान ...

किल्ले रायगड येथे शिवशाहीर विक्रम अवचिते यांचा पोवाड्याचा कार्यक्रम संपन्न!

जिल्हा परिषदेच्या मांढरेवस्ती शाळेने मिळवले गुणदर्शन स्पर्धेत यश!

म्हस्केवाडी येथे रविवारी संकष्ट चतुर्थी निमित्त उत्साहाचे आयोजन !

गुणवडी उत्कर्ष न्यासतर्फे आमदार अ‍ॅड.विक्रमसिंह पाचपुते यांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न!

शनि चौक, श्रीगोंदा येथे शहीद दिन साजरा!

महात्मा फुले उद्यान प्रकरणाने संतापाची लाट ,शहर बंद,पोलिस ठाण्यावर नागरिकांचा मोर्चा!

कौशल्याधारित शिक्षणातून महाराष्ट्राची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल- CM फडणवीस

नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा ,गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण!

उत्कृष्ट लेखापरीक्षक संतोष तरटे यांचा पुन्हा राज्यस्तरीय गौरव, सलग दुसऱ्यांदा यशाची नोंद!

कोल्हार भगवतीपूर येथे सर्व मंदिरांचे ध्वज बदलले,नववर्ष ध्वज मिरवणूक व चैत्र शोभा यात्रा संपन्न!

श्रीक्षेत्र कोंभळी येथे भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन..

स्वामींच्या दर्शनाला रांधे नगरीत भाविकांची मोठी गर्दी- ह.भ.प अशोक महाराज शिंदे .

विषमुक्त शेती करणे काळाची गरज - ह.भ.प राजेंद्रजी गोरे

श्रीगोंद्यात १००% शास्तीकर माफीचा ऐतिहासिक निर्णय,नागरिकांना मोठा दिलासा!

श्री क्षेत्र कोंभळी ते श्री क्षेत्र मढी पायी दिंडीचे भक्तिमय प्रस्थान,नाथांच्या नामगजरात परिसर दुमदुमला..

आमदार मोनिका ताई राजळे यांच्या आदेशानंतर शेवगाव आगाराची तातडीने कारवाई!