कुकडीचे उन्हाळी आवर्तन ५ मार्चपासून सुरू...

By : Sangharshkranti Team ,2026-03-04

कुकडीचे उन्हाळी आवर्तन ५ मार्चपासून सुरू...

संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा 

दि. 4 मार्च 2026

(उज्वला उल्हारे)

कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक अशी बातमी समोर आली आहे. कुकडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून उन्हाळी आवर्तन दि. ५ मार्चपासून सुरू होणार असून १४०० क्युसेक्स वेगाने पाणी विसर्ग केला जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र विधानपरिषद सभापती तथा कर्जत-जामखेड मतदारसंघाचे नेते प्रा.राम शिंदे यांनी दिली.

या वेगाने पाणी सोडल्यामुळे कालव्यामधील सर्वच चाऱ्यांपर्यंत योग्य दाबाने पाणी पोहोचणार असून शेतीपर्यंत पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध होणार आहे. ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर घेतलेला हा निर्णय कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरणार आहे.

रब्बी पिकांना आधार, पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटणार

उन्हाळी आवर्तनामुळे रब्बी पिकांना आवश्यक असलेले पाणी वेळेत मिळणार आहे. मागील वर्षी चांगले पर्जन्यमान झाल्यामुळे पिकाखालील क्षेत्रात वाढ झाली होती. मात्र उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाईची भीती शेतकऱ्यांना सतावत होती. या पार्श्वभूमीवर ५ मार्चपासून सुरू होणारे आवर्तन हे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

या आवर्तनामुळे केवळ शेतीच नव्हे, तर पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही मोठ्या प्रमाणात मार्गी लागणार आहे. कर्जत तालुक्यातील तब्बल ५४ गावांना या निर्णयाचा थेट लाभ मिळणार आहे.

ऊस, कांदा, डाळिंबासह फळबागांना नवसंजीवनी

या आवर्तनाचा फायदा ऊस, कांदा, मका, डाळिंब, केळी, पेरू आदी पिकांना होणार आहे. विशेषतः फळबागांसाठी उन्हाळ्यातील पाणी अत्यंत गरजेचे असते. योग्य वेळेत मिळणाऱ्या पाण्यामुळे उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक गणित सुधारण्यास मदत होणार आहे.

शेतकऱ्यांना योग्य वेळी आणि पुरेशा दाबाने पाणी उपलब्ध झाल्यास पिकांची वाढ, उत्पादनक्षमता आणि गुणवत्ता यावर सकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे या उन्हाळी आवर्तनामुळे कर्जत तालुक्यातील शेतीला नवी उभारी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाआभियानातून कार्यकर्ते घडतात - सभापती प्रा.राम शिंदे

श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गडावर अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन!

१५ दिवसांपासून भरकटलेल्या मनोरुग्ण वृद्ध महिलेला अखेर कुटुंबाचा आधार!

आकाश सूर्यवंशी यांचा ‘बेस्ट इंजिनिअरिंग अवॉर्ड’ने सन्मान ...

किल्ले रायगड येथे शिवशाहीर विक्रम अवचिते यांचा पोवाड्याचा कार्यक्रम संपन्न!

जिल्हा परिषदेच्या मांढरेवस्ती शाळेने मिळवले गुणदर्शन स्पर्धेत यश!

म्हस्केवाडी येथे रविवारी संकष्ट चतुर्थी निमित्त उत्साहाचे आयोजन !

गुणवडी उत्कर्ष न्यासतर्फे आमदार अ‍ॅड.विक्रमसिंह पाचपुते यांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न!

शनि चौक, श्रीगोंदा येथे शहीद दिन साजरा!

महात्मा फुले उद्यान प्रकरणाने संतापाची लाट ,शहर बंद,पोलिस ठाण्यावर नागरिकांचा मोर्चा!

कौशल्याधारित शिक्षणातून महाराष्ट्राची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल- CM फडणवीस

नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा ,गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण!

उत्कृष्ट लेखापरीक्षक संतोष तरटे यांचा पुन्हा राज्यस्तरीय गौरव, सलग दुसऱ्यांदा यशाची नोंद!

कोल्हार भगवतीपूर येथे सर्व मंदिरांचे ध्वज बदलले,नववर्ष ध्वज मिरवणूक व चैत्र शोभा यात्रा संपन्न!

श्रीक्षेत्र कोंभळी येथे भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन..

स्वामींच्या दर्शनाला रांधे नगरीत भाविकांची मोठी गर्दी- ह.भ.प अशोक महाराज शिंदे .

विषमुक्त शेती करणे काळाची गरज - ह.भ.प राजेंद्रजी गोरे

श्रीगोंद्यात १००% शास्तीकर माफीचा ऐतिहासिक निर्णय,नागरिकांना मोठा दिलासा!

श्री क्षेत्र कोंभळी ते श्री क्षेत्र मढी पायी दिंडीचे भक्तिमय प्रस्थान,नाथांच्या नामगजरात परिसर दुमदुमला..

आमदार मोनिका ताई राजळे यांच्या आदेशानंतर शेवगाव आगाराची तातडीने कारवाई!