By : Sangharshkranti Team ,2026-02-20
संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा
दि.20 फेब्रुवारी 2026
(उज्वला उल्हारे)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आग्रा किल्ला, उत्तर प्रदेश येथे शिवजन्मोत्सव संपूर्ण भारतवर्ष का 2026 येथे प्रमुख उपस्थिती दर्शवत महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देत संबोधित केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वाभिमान काय असतो हे ज्या आग्रा येथील किल्ल्यातून जगाला दाखवले, त्याच किल्ल्यात आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा सोहळा साजरा करत आहोत. पुढील वर्षी शिवजयंतीला आपण एकत्र येऊ तेव्हा येथे शिवस्मारक उभारण्याची तयारी करत असू.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देशात छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा आणि मराठ्यांचा इतिहास शिकवला जात असल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मुघलांनी देशाला चोहोबाजूंनी घेरले होते तेव्हा अनेक राजे मुघलांना शरण गेले, मात्र त्यावेळी राजमाता जिजाऊ माँसाहेब यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना स्वराज्य स्थापन करण्याची प्रेरणा दिली. याच प्रेरणेच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरापगड जातींना एकत्र करत स्वराज्य स्थापन केले. तसेच मावळ्यांना विश्वास दिला की ही लढाई देव, देश आणि धर्म यासाठी आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या मावळ्यांच्या साथीने मुघलांच्या लाखोंच्या फौजेचा गनिमी काव्याने पराभव केला. खुद्द औरंगजेबही दख्खन ताब्यात घेण्यासाठी महाराष्ट्रात आला. मात्र, त्याच महाराष्ट्रात मराठ्यांनी त्याची कबर खोदली.
यावेळी केंद्रीय मंत्री सी. आर. पाटील, राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, मंत्री ॲड. आशिष शेलार, मंत्री योगेंद्र उपाध्याय (उत्तर प्रदेश), अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज नसते तर भारताचा इतिहास, भूगोल काहीही शिल्लक राहिले नसते - CM फडणवीस
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे उर्जा, विश्वास आणि शौर्याचे प्रतीक!
श्री क्षेत्र मढी येथे पर्यावरण पूरक भट्टी होळी पेटून यात्रा उत्सवाचा शुभारंभ!
श्रीगोंदा येथे जोधपुर मारुती चौकात नेत्र दीपक शिवजयंती उत्सवाचे आयोजन!
आई-वडिलांच्या पायी चारीधामाचे पुण्य- ह.भ.प.राजेंद्रजी गोरे महाराज
सदगुरु कृषी महाविद्यालयात क्रांतिवीर लहुजी वस्ताद व क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांना विनम्र अभिवादन!
मुंबई क्लायमेट वीक 2026 : हरित भविष्यासाठी जागतिक संकल्प!
बहुध्रुवीय जगात विश्वासाचा केंद्रबिंदू भारत आणि महाराष्ट्र - CM फडणवीस
शाळेने दिलेल्या संस्काराची परतफेड करण्याची हीच योग्य वेळ - मा.अध्यक्ष बाबासाहेब भोस
पशुधन संवर्धनातून कृषीक्षेत्राला नवसंजीवनी - मुख्यमंत्री फडणवीस
ऑन्कोलॉजी बियॉन्ड बॉर्डर्स कर्करोगाविरुद्ध लढ्याला नवी दिशा - CM फडणवीस
राजरत्न पुरस्कार सोहळा 2026 : परंपरा, प्रतिष्ठा आणि कर्तृत्वाचा गौरव!
नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या २०२५-२६ गाळप हंगामाची यशस्वी सांगता!
गुणवडी तलावातून १६ फेब्रुवारीपासून आवर्तन सोडण्याचे निर्देश!
शासकीय कार्यालयांत आता नागरिकांना अभिप्राय देता येणार ...
लिंपणगावच्या सिद्धेश्वर महाराजांचा महाशिवरात्री निमित्त यात्रा उत्सव!
महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी प्रो. डॉ. प्रकाश साळवे
आपला एक दगड नाथ मंदिरासाठी…
शिक्षणाने माणुस घडतो पण माणुसकी कमवावी लागते - साहित्यिक अनंत कराड
पारधी विकास आराखड्याची पारदर्शक अंमलबजावणी करा- आदिवासी शक्ती संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन..