By : Sangharshkranti Team ,2025-12-18
संघर्षक्रांती वृत्तवेध | श्रीगोंदा
दि . १८डिसेंबर २०१५
उज्वला उल्हारे याजकडून ,
श्रीगोंदा :-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगर विकास खात्या मार्फत राज्यात वेगाने कामे होत असल्याने तसेच आपण नगराध्यक्ष आणि नगरसेवक म्हणून शहर आणि जुना प्रभाग क्रमांक ४आताचा प्रभाग क्रमांक ७ मध्ये रस्ते आणि गटारीची समस्या सोडवल्याने नागरिकांनी शिवसेनेच्या स्वतंत्र पॅनलचे स्वागत केले शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ.शुभांगी पोटे व नगरसेवक पदाची निवडणूक लढवणारे सर्व उमेदवार विजयी होतील आणि शनिवार दिनांक २० डिसेंबर रोजी प्रभाग क्रमांक ७ब मधील होणाऱ्या एका जागेच्या निवडणुकीत आपण मोठ्या फरकाने विजयी होऊ असा विश्वास माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
प्रभाग क्रमांक ७ब मधील मतदारांच्या भेटीत नागरिकांचा प्रतिसाद मिळत असून नागरिक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून झालेल्या विकासकामावर समाधानी असून भविष्यात देखील विकास कामे वेगाने होतील अशी खात्री नागरिकांना आहे असे सांगून पोटे म्हणाले आम्ही विकास कामाच्या माध्यमातून मत मागत आहोत.नागरिकांनी देखील पूर्वीच्या काळात असलेल्या समस्या आणि आमच्या साडेसात वर्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात झालेली कामे पाहिली आहेत नगर परिषद हि नागरिकांच्या नागरी सुविधा पुरविण्यासाठी प्राधान्याने काम करते आम्ही देखील सामान्य नागरिक केंद्रबिंदू मानूनच काम केले त्यामुळेच अशक्य वाटणारे स्वतंत्र पॅनल अखेर उभे राहिले उमेदवार नागरिकांच्या विश्वासास पात्र असणारी मिळाले असे सांगून प्रभाग क्रमांक ७ब मधील आपला विजय निश्चित होईल आणि शहर विकासाची घोड दौड सुरू राहील असे स्पष्ट केले.यावेळी मनोहर पोटे यांनी प्रभाग क्रमांक ७ मधील केलेल्या रविवार पेठ रस्ता,हनुमान नगर मधील प्रलंबित रस्त्यांची केलेली कामे,आदींची माहिती दिली.
*चौकट*
प्रभाग क्रमांक ७ मधील इंदिरा नगर वसाहत हि श्रमिकांची वसाहत असून त्यांना हक्काची जागा मिळावी हि मागणी वर्षानुवर्ष होत राहिली पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बाबत धोरण घेत स्वतःची हक्काची जागा मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला आपण नामदार एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून येथील रहिवाशांचा हक्काच्या जागेचा आणि त्यावरील घरकुल बाबतचा प्रश्न सोडवू असे मनोहर पोटे यांनी सांगितले.
यावेळी नंदकुमार ताडे, बाळासाहेब दुतारे आदी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज नसते तर भारताचा इतिहास, भूगोल काहीही शिल्लक राहिले नसते - CM फडणवीस
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे उर्जा, विश्वास आणि शौर्याचे प्रतीक!
श्री क्षेत्र मढी येथे पर्यावरण पूरक भट्टी होळी पेटून यात्रा उत्सवाचा शुभारंभ!
श्रीगोंदा येथे जोधपुर मारुती चौकात नेत्र दीपक शिवजयंती उत्सवाचे आयोजन!
आई-वडिलांच्या पायी चारीधामाचे पुण्य- ह.भ.प.राजेंद्रजी गोरे महाराज
सदगुरु कृषी महाविद्यालयात क्रांतिवीर लहुजी वस्ताद व क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांना विनम्र अभिवादन!
मुंबई क्लायमेट वीक 2026 : हरित भविष्यासाठी जागतिक संकल्प!
बहुध्रुवीय जगात विश्वासाचा केंद्रबिंदू भारत आणि महाराष्ट्र - CM फडणवीस
शाळेने दिलेल्या संस्काराची परतफेड करण्याची हीच योग्य वेळ - मा.अध्यक्ष बाबासाहेब भोस
पशुधन संवर्धनातून कृषीक्षेत्राला नवसंजीवनी - मुख्यमंत्री फडणवीस
ऑन्कोलॉजी बियॉन्ड बॉर्डर्स कर्करोगाविरुद्ध लढ्याला नवी दिशा - CM फडणवीस
राजरत्न पुरस्कार सोहळा 2026 : परंपरा, प्रतिष्ठा आणि कर्तृत्वाचा गौरव!
नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या २०२५-२६ गाळप हंगामाची यशस्वी सांगता!
गुणवडी तलावातून १६ फेब्रुवारीपासून आवर्तन सोडण्याचे निर्देश!
शासकीय कार्यालयांत आता नागरिकांना अभिप्राय देता येणार ...
लिंपणगावच्या सिद्धेश्वर महाराजांचा महाशिवरात्री निमित्त यात्रा उत्सव!
महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी प्रो. डॉ. प्रकाश साळवे
आपला एक दगड नाथ मंदिरासाठी…
शिक्षणाने माणुस घडतो पण माणुसकी कमवावी लागते - साहित्यिक अनंत कराड
पारधी विकास आराखड्याची पारदर्शक अंमलबजावणी करा- आदिवासी शक्ती संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन..