नगराध्यक्ष पदासाठी इंद्रायणी पाचपुते चर्चेत ? श्रीगोंदा नगरीत वातावरण वातावरण सस्पेन्स .!

By : Sangharshkranti Team ,2025-11-07

नगराध्यक्ष पदासाठी इंद्रायणी पाचपुते चर्चेत ? श्रीगोंदा नगरीत वातावरण वातावरण सस्पेन्स .!

संघर्षनामा वृत्तसेवा । श्रीगोंदा
दि .४ नोव्हेंबर २०२५
श्रीगोंदा प्रतिनिधी,
राज्यात सर्वत्र निवडणुकांच्या चर्चेला जोर चढला असताना श्रीगोंदा नगरपालिकेची निवडणूकही आता हळूहळू केंद्रस्थानी येऊ लागली आहे. लागलीच निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता व्यक्त होत असून, नगराध्यक्षपदी कोण? या प्रश्नावर गावागावात, चौकाचौकात चर्चेचा विषय रंगत चालला आहे.
जुने अनुभवी चेहरे आणि नव्या दमाचे उत्साही उमेदवार अशी स्पर्धा रंगताना दिसत असताना, याच पार्श्वभूमीवर एक नाव सध्या सर्वाधिक चर्चेत आहे ते म्हणजे सौ. इंद्रायणी प्रतापसिंह पाचपुते.
नगरपालिकेच्या राजकारणात हे नाव नवीन असले तरी पाचपुते घराण्याच्या राजकीय वारशाशी जोडले गेल्यामुळे या नावाभोवती राजकीय वर्तुळात विशेष चर्चा सुरु झाली आहे.
सौ. इंद्रायणी प्रतापसिंह पाचपुते या राज्याचे माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या सूनबाई आणि आमदार ॲड.विक्रमसिंह पाचपुते यांच्या भावजय आहेत. त्यामुळे पाचपुते परिवारातील हे संभाव्य उमेदवार असलेले पहिलेच नाव असल्याने या चर्चेला अधिक वजन मिळाले आहे.
श्रीगोंदा नगरपालिकेत जर पाचपुते घराण्याने उमेदवारी केली तर निवडणुकीचा तोल एका क्षणात बदलू शकतो,अशी कार्यकर्त्यांमधील चर्चा रंगली आहे.
राजकारणात पाचपुते परिवाराने नेहमीच सर्वसामान्य नागरिकांशी जवळीक ठेवली आहे. कार्यकर्त्यांना सन्मान, जनतेच्या अडचणींमध्ये तत्पर सहभाग आणि विकासाभिमुख भूमिका या गोष्टींमुळे या घराण्याचा जनतेत अजूनही विश्वास कायम आहे. त्यामुळेच सौ.इंद्रायणी पाचपुते यांच्या नावावर चर्चा होताच कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आणि उत्साह दोन्ही दिसून येत आहेत.
या अगोदर पाचपुते घराण्याने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेत सातत्याने आपली ताकद दाखवली आहे. बहुतेक वेळा विजय मिळवत घराण्याने आपल्या जनाधाराचे वातावरण वाढलेले आहे.
जर यावेळी सौ. इंद्रायणी पाचपुते नगरपालिकेच्या रणांगणात उतरल्या, तर या परिवारातील सदस्य म्हणून त्या नगरपालिकेची निवडणूक लढविणाऱ्या पहिल्या महिला उमेदवार ठरतील.
एकूणच, श्रीगोंद्यातील राजकारण सध्या सस्पेन्स मोडमध्ये आहे.
पाचपुते कुटुंबाने जर सौ.प्रतापसिंह इंद्रायणी पाचपुते यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले, तर श्रीगोंदा नगरपालिकेची लढत नक्कीच रंगतदार आणि ऐतिहासिक ठरणार, असा विश्वास कार्यकर्त्यांचा आहे.

छत्रपती शिवाजी महाराज नसते तर भारताचा इतिहास, भूगोल काहीही शिल्लक राहिले नसते - CM फडणवीस

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे उर्जा, विश्वास आणि शौर्याचे प्रतीक!

श्री क्षेत्र मढी येथे पर्यावरण पूरक भट्टी होळी पेटून यात्रा उत्सवाचा शुभारंभ!

श्रीगोंदा येथे जोधपुर मारुती चौकात नेत्र दीपक शिवजयंती उत्सवाचे आयोजन!

आई-वडिलांच्या पायी चारीधामाचे पुण्य- ह.भ.प.राजेंद्रजी गोरे महाराज

सदगुरु कृषी महाविद्यालयात क्रांतिवीर लहुजी वस्ताद व क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांना विनम्र अभिवादन!

मुंबई क्लायमेट वीक 2026 : हरित भविष्यासाठी जागतिक संकल्प!

बहुध्रुवीय जगात विश्वासाचा केंद्रबिंदू भारत आणि महाराष्ट्र - CM फडणवीस

शाळेने दिलेल्या संस्काराची परतफेड करण्याची हीच योग्य वेळ - मा.अध्यक्ष बाबासाहेब भोस

पशुधन संवर्धनातून कृषीक्षेत्राला नवसंजीवनी - मुख्यमंत्री फडणवीस

ऑन्कोलॉजी बियॉन्ड बॉर्डर्स कर्करोगाविरुद्ध लढ्याला नवी दिशा - CM फडणवीस

राजरत्न पुरस्कार सोहळा 2026 : परंपरा, प्रतिष्ठा आणि कर्तृत्वाचा गौरव!

नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या २०२५-२६ गाळप हंगामाची यशस्वी सांगता!

गुणवडी तलावातून १६ फेब्रुवारीपासून आवर्तन सोडण्याचे निर्देश!

शासकीय कार्यालयांत आता नागरिकांना अभिप्राय देता येणार ...

लिंपणगावच्या सिद्धेश्वर महाराजांचा महाशिवरात्री निमित्त यात्रा उत्सव!

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी प्रो. डॉ. प्रकाश साळवे

आपला एक दगड नाथ मंदिरासाठी…

शिक्षणाने माणुस घडतो पण माणुसकी कमवावी लागते - साहित्यिक अनंत कराड

पारधी विकास आराखड्याची पारदर्शक अंमलबजावणी करा- आदिवासी शक्ती संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन..